Non-Agricultural Land अर्ज करण्याची पद्धत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागेल. अर्ज मिळाल्यावर जिल्हाधिकारी सात दिवसात तहसीलदारांना अर्ज पाठवतात. तहसीलदार अर्जाची पाहणी करतात आणि त्यानुसार पुढची प्रोसेस केली जाते.
![Non-Agricultural Land](https://atharvarohi.co.in/wp-content/uploads/2023/05/Non-Agricultural-Land-300x225.jpg)
तहसीलदार कोणत्या गोष्टीची पाहणी करतात
- जमिनी गाव पातळीवर शेतकरी सहकारी विकास सोसायटीकडून कोणतेही कर्ज भरल्याचे प्रमाणपत्र गरजेचे आहे.
- जी जमीन एन ए करायचे आहे ती कोणत्याही कामासाठी किंवा प्रकल्पासाठी घ्यायची किंवा अधिक्रहित करायची नाही असे सांगणारे तलाठ्याचे पत्र घ्याव लागेल.
- तहसीलदार जमिनीचा मालक आहे का नाही हे तलाठ्याकडून चौकशी करून घेतात.
- तसेच तहसीलदार हे जमीन एन ए झाल्यानंतर पर्यावरणीय अडचणीत किंवा प्रकल्पाला धोका असणार नाही हे पाहतात.
- तहसीलदार ही सगळी तपासणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी जमीन रूपांतराची ऑर्डर किंवा आदेश काढला जातो आणि तलाठी कार्यालयात जमीन जी एन ए अशी नोंद केली जाते.
- तर अशाप्रकारे एन ए ची प्रोसेस आहे.
- यामध्ये महत्त्वाची सूचना एनए झालेली जमिनीचा त्या कामासाठी उपयोग जर झाला नाही तर ती एनए म्हणून रद्द केली जाते.
- आणि भरलेली जी रक्कम म्हणजेच नजराना तो सरकारकडे जमा केला जातो त्यानंतर पैसे परत भेटत नाही.
![Jilha Parishad Bharti 2023](https://atharvarohi.co.in/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif)
Non-Agricultural Land कागदपत्रे
- जिल्हाअधिकारी कार्यालयात मिळणारा फॉर्म भरून त्यावर कोर्टाचा पाच रुपयाचा स्टॅम्प,
- जमिनीचा सातबारा,
- आठ अ उतारा,
- उत्तराच्या चार झेरॉक्स,
- जमिनीचा फेरफार उतारा,
- महसूल विभागाकडे रेकॉर्ड,
- अधिकाऱ्याकडून जमिनीचे कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र,
- तालुका जमीन रेकॉर्ड कार्यालयाने दिलेला जमिनीचा नकाशा लागेल,
![Jilha Parishad Bharti 2023](https://atharvarohi.co.in/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif)
नातवाचा आजोबांच्या संपत्तीवरील अधिकार असतो का?
- Non-Agricultural Land जर इमारतीसाठी एन ए करायचे असेल तर बिल्डिंग प्लॅनचा 8 प्रतिही लागेल.
- जर जमीन कोणत्याही प्रकल्पाच्या आड येत नसेल तर त्याची खातर जमा करण्यासाठी चालू सातबारा लागेल.
- जमीन राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग जलद गती महामार्ग यामध्ये येत असेल तर राज्य महामार्ग प्राधिकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जलद गती महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून नहारकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
- आणि ग्रामीण भागात असाल तर ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक असते,
- जर शहरी भागात असाल तर महापालिका किंवा शहरी स्वराज्य संस्थेचे प्रमाणपत्र गरजेचे असते,
- जर जमीन बॉम्बे वही वाट आणि शेती फायदा 1948 अंतर्गत असेल तर त्यासाठी परवानगी 43 63 नुसार मिळणे आवश्यक असते.
BBT Plus 399 Scheme :399 दिवसाच्या ह्या योजनेत फायदाच फायदा
Magel Tyala Vihir 2023 :आता मागेल त्याला मिळेल विहीर आताच करा अर्ज