Unseasonable Rain वादळी वारा व विजांच्या कडकडाटात शुक्रवारी झालेल्या वळवाच्या पावसाने राज्याला झोडपले असून, वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला झाला. राज्यात ३५ जनावरे दगावले असून आंबा, कांदा, भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पिके आणि पशुधन दगावल्याने बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या पावसाच्या तडाख्यातून शेतकरी सावरत नाही तोच पुन्हा वादळी वाऱ्याने उरली- सुरली पिके मातीत गेली आहेत. अनेक भागांत वीज वाहिन्या तुटून पडल्या. वृक्ष उन्मळले.
गारपीट, वादळी वाऱ्याने पिकांची नासाडी; पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज
- शुक्रवारी सकाळपासून राज्याच्या विविध भागांत ढगाळ वातावरण होते.
- दुपारनंतर वादळी वारा, विजांच्या कडकडाटात अनेक भागांत गारपीट आणि जोरदार पाऊस झाला.
- विदर्भात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
विदर्भात मोठे नुकसान :
- पश्चिम विदर्भात वादळी वायामुळे भाजीपाला, फळपिके व आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.
- पूर्व विदर्भात वर्धा आणि गोंदियात वादळी पावसाचा फटका बसला.
- यवतमाळसह नेर, बाभूळगाव आणि महागाव तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता.
- राज्यात ठिकठिकाणी शनिवार, रविवारी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
- मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

Unseasonable Rain भिंत कोसळून चिमुकलीचा मृत्यू
- बुलढाण्यातील काटेल धाम (ता. संग्रामपूर) येथे भिंत कोसळून कृष्णाली बोरकर या दोनवर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला.
वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
- वीज पडल्याने बुलढाण्यातील चितोडा (ता. खामगाव) येथे गोपाल महादेव कवळे (वय ४०),
- कोल्हापुरात मौजे रेठरे (ता. शाहूवाडी) येथे बाबूराब दादू जाधव (६१) यांचा मृत्यू झाला.
लातूर जिल्ह्यात आंबा आणि द्राक्षांचे मोठे नुकसान
- निलंग्यासह तालुक्यातील औराद शहाजानी, देवणी, वलांडी, खरोसा या भागात शुक्रवारी सकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला.
- त्यामुळे भाजीपाल्यासह फळबागांचे नुकसान झाले आहे.
- तीन आठवड्यांपूर्वी अवकाळी पाऊस होऊन पिकांचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे झाले…
- मात्र, अद्यापही मदत पदरी पडली नाही.
- औराद शहाजानी परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
- सकाळी ८ वा. पर्यंत २५ मिमी पाऊस झाला.
- धाराशिवमधील उमरगा तालुक्यात ४ जनावरे दगावली.

५ वर्षात मिळेल १३८९५००रु. तेही सरकारच्या सुरक्षा सोबत
Unseasonable Rain छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा
- Unseasonable Rain जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, पैठण, कन्नड या तालुक्यांत शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाचा तडाखा बसला.
- सिल्लोड तालुक्यातील सिरसाळा तांडा येथे बहिणीला भेटायला आलेल्या अंबादास भिक राठोड (वय २७, रा. वरसाडा तांडा, ता. पाचोरा, जि. जळगाव) या तरुणाचा वीज अंगावर पडून जागीच मृत्यू झाला.
Phone Pay Income :फोन पे ने कमवा रोज 400 रुपये
Government Update :शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले २३ हजार कोटी
1 thought on “Unseasonable Rain :राज्याला पुन्हा अवकळी तडाखा”