Tar Bandi Yojana Maharashtra :तार बंदी योजना महाराष्ट्र 2022

Tar Bandi Yojana Maharashtra शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वकांशी योजना म्हणून ज्या योजनेकडे पाहिले जात त्या योजनेच नाव आहे तार बंदी योजना. महाराष्ट्र सरकार तर्फे 2022 मध्ये शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची योजना या ठिकाणी तयार केलेले आहे आणि त्या योजनेचे नाव आहे तार बंदी योजना महाराष्ट्र 2022.

शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आणि त्या संबंधित सर्व गोष्टीसाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत अर्ज कसा करायचा इत्यादी प्रकारची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.

  • केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांपैकी तार बंदी योजना ही महत्त्वाची योजना समजली जाते.
  • सरकारने तारबंदी योजना नावाने सुरू केली आहे आणि या योजनेचा लाभ देशातील शेतकऱ्यांना त्यामध्ये अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे आणि या योजनेच्या मदतीने शेतकरी इतर भटक्या जनावरंपासून आपले पिकांचे संरक्षण करू शकेल म्हणून ही योजना तयार करण्यात आलेली आहे.
Tar Bandi Yojana Maharashtra

योजनेचे उद्दिष्ट

  • भटक्या जनावरापासून शेतकऱ्यांचे पिकाचे संरक्षण करणे हेच या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • अशा परिस्थितीमध्ये भटकी जनावर शेतकऱ्यांच्या शेतात येऊन नुकसान करतात आणि ही भीती सर्व शेतकरी वर्गामध्ये दिसून येते असं शासनाच्या लक्षात आल्या नंतर शेताच्याकडे कुंपण घालण्यासाठी 40 ते 50 हजार रुपयांची आर्थिक मदत या योजनेमार्फत करण्यात करण्यात येणार आहे.

Tar Bandi Yojana Maharashtra मिळणारे अनुदान

  • तार बंदी योजनेसाठी शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपयांची मदत सरकारकडून केली जाणार आहे.
  • या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान शासनाकडून दिले जाणार असून 50 टक्के शेतकऱ्यांना स्वतः खर्च करायचा आहे.
  • या योजनेतून मिळणारी रक्कम थेट शेतकरी लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये पाठवली जाईल आणि या योजनेचा लाभ मिळवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना त्याच्या मोबाईल द्वारे ऑनलाईन अधिकृत स्थळावरून या ठिकाणी अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पात्रता

  • ज्या शेतकऱ्याकडे लागवडीसाठी अर्धा एकर जमीन आहे त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येईल.
  • 400 मीटर ची तार बंद झल्यानंतर शेतकऱ्याला अनुदान दिले जाईल.
  • या योजनेचा लाभ देशातील सर्व अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना घेता येणार आहेत.
  • अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणार गरजेचे आहे.

कागदपत्रे

  • अर्जदाराचे मतदान कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशन कार्ड
  • जमिनीची जमाबंदी
  • कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर त्यांना लगेचच काही दिवसाच्या आत शासनातर्फे तार बंदी अनुदान प्राप्त होणार आहे.
Tar Bandi Yojana Maharashtra अर्ज कोठे करावा
  • Tar Bandi Yojana Maharashtra तुम्हाला तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्र म्हणजे सीएससी केंद्रात जावे लागेल.
  • अर्जदार कृषी विभागाच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतील.
  • त्यानंतर तुम्हाला तार बंदी योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक ती कागदपत्र तुमचे एजंटला द्यावे लागतील.
  • आणि एजंटने विचारलेली सर्व माहिती आवश्यक ती कागदपत्रे अपलोड केली जातील.
  • आणि अर्ज भरल्यानंतर शेवटी तुम्हाला अर्जाची पावती दिली जाईल.
  • नंतर कार्यालयात तुमचा अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी अधिकाऱ्यामार्फत केली जाईल.
  • अर्ज पूर्ण पडताळणी झाल्यानंतर अर्जदाराला एसएमएस द्वारे मेसेज देऊन योजनेबद्दल सांगितले जाईल.

Aadhar Update : आधार अपडेट करा, नाही तर अनुदान विसरा…

flour mill subsidy :महिलांना मिळेल मोफत पिठाची गिरणी

Leave a Comment

error: Content is protected !!