Mahabhumi Land Record राज्यात तुकडेबंदी कायदा अस्तित्वात असून देखील जमिनींचे तुकडे पाडून दस्त नोंदणी करण्यात येत होती.
याबाबत अनेक गैरप्रकार समोर आल्यानंतर तुकड्यातील एक दोन गुंठे जमीन यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी करण्यासाठी बंदी घालण्यात आली.
तसेच अशा प्रकारच्या जमिनीची खरेदी विक्री करायची असल्यास संबंधित क्षेत्राचे रेखांकन म्हणजेच Lay Out करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. या निर्णयाला औरंगाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.
मात्र त्यावर दाखल पुनराविलोकन याचिकेवर सुनावणी होऊन औरंगाबाद उच्च न्यायालयाने तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन करून होणाऱ्या दस्त नोंदणीला तूर्त स्थगिती दिली आहे.
याबाबतची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. येथे आठ दिवसात याबाबतचा निर्णय न्यायालयाकडून दिला जाणार आहे. Mahabhumi Land Record त्यानंतरच तुकड्यातील जमिनीची दस्त नोंदणी होईल किंवा कसे हे स्पष्ट होणार आहे.
Mahabhumi Land Record नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 12 जुलै 2021 रोजी तुकडे बंदी तुकडे जोड सुधारणा अधिनियमाच्या कलम-ब नुसार परिपत्रक प्रस्तुत केले. त्यानुसार एक दोन तीन गुंठे जागांचे व्यवहार करताना संबंधित क्षेत्राचे रेखांकन करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतल्यास दस्त नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले होते.त्याकरिता प्रत्येक जिल्ह्याचे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार नाकारले जात होते. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.
Krushi Vibhag Saralseva Bharti :कृषी विभागात सरळ सेवा भरती
Mudra Loan SBI : मुद्रा लोन योजनेद्वारे मिळणार १० लाख रुपये कर्ज…
Land transfer record new update : जमीन नावावर करा आता फक्त 100 रुपयांत नवीन शासन निर्णय लागू
3 thoughts on “Mahabhumi Land Record – अतिक्रमण केलेली जमीन फक्त एक दिवसात परत, शासनाचा नविन निर्णय”